Friday, December 17, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} नविन चारोळ्या !!!


तो तुझ्या गावातला पाऊस
माझ्या गावात फिरकलाच नाही
आयुष्यातला वैशाख असा
अजून कुठं संपलाच नाही.




अपेक्षाभंगाचं दु:ख तरी कुठलं
अपेक्षाच नव्हती तर?
माझ्या मनाचं काय घेवून बसलीस
तुझ्या मनातच नव्हतं तर?




नसतेस कधी मागे
तू ही मला छळण्यात
ओठ असतात मुके आणि
भलतेच असते डोळ्यात.




अशीच सारखी तु माझी
कायमच परीक्षा पहातोस
खर सांग तु माझ्यावर नक्की
कितपत विश्वास ठेवतोस




कोण कुणाची परिक्षा पहातंय
हे तर सगळं जग पहातंय
विश्वासाचं म्हणशील तर तो
पानिपतात गेल्याचं माहितंय.




तू म्हटलेस "जा"
मी वळलो फक्त
"परत ये" म्हणतेस कां
पाहिले होते फक्त.




ठरावामध्ये ठरतं का कधी
अश्रुंचं येणं-जाणं
आठवणी मनात दाटल्या कि
आपसुक डोळ्यांत साठतं




दोघे ही अबोल राहीलो म्हणुन
शब्दांना वाट फुटलीच नाही
तु बोलशील तु बोलशील असं म्हणत
नि:शब्दता कधी ओसरलीच नाही




शुन्याला एकदा भेट म्हणतोस
शुन्यातुन आधी बाहेर पडु तर दे
वजाबाकी करुन निरुत्तर झाले खरी
पण एकदा तरी उत्तर तपासुन बघु दे




तुझा दुसरा प्रश्न आला
उत्तराच्या आधीच
मी तर निरूत्तर असतोच
पहिल्याच्या आधीच

चारोळी लेखक : डॉ. अशोक आणि निशिगंधा





--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.