Friday, June 10, 2011

{ Marathi kavita } रखवालदार ते 'सोनेरी' आमदार...

 


रमेश वांजळे यांचे मूळ गाव अहिरे. गावातच त्यांचे लहानपण गेले. तीन भावंडांमधील वांजळे हे थोरले. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. त्य

ातच वडील सरपंच असल्याने राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी काही काळ तालीम केली. शरीरसौष्ठव चांगले असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांना रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीत त्यांनी काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली. परंतु ही नोकरी फार काळ टिकू शकली नाही. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रूपात राजकीय गुरू मिळाले. मोरे यांच्यासमवेत काम करीत त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि ते प्रथम अहिरे गावचे सरपंच झाले. या सरपंचपदातून त्यांनी राजकीय धडे घेत झेप घेतली. हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ते विजयी झाले. एवढेच नव्हे, तर पंचायत समितीचे उपसभापतिपद त्यांनी मिळविले. राजकीय वाटचालीत माघार घ्यायची नाही, ही त्यांची वृत्ती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वांजळे यांचा गट महिलांसाठी आरक्षित झाला. हा गट आरक्षित झाल्यावर त्यांनी आपली पत्नी हर्षदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या.

जिल्हा परिषदेत पत्नी निवडणूक आल्यावर त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करणे पसंत केले. याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे त्यांना अन्य पक्षांकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी 'राष्ट्रवादी'कडे उमेदवारी मागितली. पण 'राष्ट्रवादी'ने उमेदवारी दिली नाही; त्यानंतर भाजप-शिवसेनेकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडूनही तिकीट न मिळाल्याने वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळेपासून वांजळे हे हमखास आमदार होणार, अशी चर्चा सुरू झाली. प्रचाराची आगळीवेगळी पद्धत, गळ्यातील आठशे ग्रॅम सोने, कार्यर्कत्यांचे मोठे जाळे आणि उत्कृष्ट भाषणशैली यामुळे त्यांची मोठी छाप मतदारांवर पडली. एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायक भासावा अशी त्यांची यष्टी. डोळ्यांवर गॉगल, दाढी वाढलेली आणि अंगभर सोने यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. संत तुकारामांचे मुखोद्गत अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या ते भाषणात म्हणून दाखवीत आणि त्यांची छाप आणखी गडद होत गेली. त्यामुळे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना वांजळे दगडूशेठ मंदिरात बसून होते. निकाल कळाल्यावरच ते मंदिरातून बाहेर पडले.

अंगावर मिरविणाऱ्या सोन्यामुळे अगदी आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारापासूनच वांजळे चचेर्त राहिले होते. तमाम 'वृत्तवाहिन्यां'नी त्यांना गोल्डमॅनचा 'किताब' बहाल करून टाकला होता. विधिमंडळापासून कोणत्याही सभा-समारंभांमध्ये वांजळे उपस्थित झाले, की बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या अंगावरील सोने न्याहाळत. तसेच, त्यांच्यासमवेत छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे सरसावत.

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मात्र या 'गोल्डमॅन'चे विक्राळ रूप उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात 'मनसे'ने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विधिमंडळात पक्षाचे आमदार घोषणाबाजी करीत होते. त्या वेळी आझमी यांच्यासमोरील माईकचे पोडियम उखडून टाकतानाचे वांजळेही मराठी जनतेने पाहिले.

आमदार झाल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी वांजळे यांचा विजयी जल्लोष काही औरच होता. आपली पत्नी हर्षदा हिला चक्क उचलून त्यांनी आपली पहिलीवहिली आमदारकी साजरी केली होती. वांजळेंच्या या सेलिब्रेशनची खबर मिळताच उशिराने दाखल झालेले कॅमेरे-वाहिन्यांसाठी त्यांनी या जल्लोषाचा 'रीटेक'ही केला.

गेल्या काही दिवसांपासून 'आमदार आपल्या दारी' या योजनेच्या निमित्ताने ते आपला खडकवासला मतदारसंघ पिंजून काढत होते.

व्यवसायातून आर्थिकवृद्धी... काशीदर्शन यात्रा

रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मोठा दबदबा. लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध. त्यातूनच एनडीएमध्ये ज्यूसबार सुरू करण्यास त्यांना परवानगी मिळाली. हाच ज्यूसबार त्यांच्या उत्पन्नाचा व आथिर्क उन्नतीचा मोठा मार्ग ठरला. दररोज मंडईतून ट्रकभर फळे आणायची. त्याचा ज्यूस करायचा आणि एनडीएतील छात्रांना विकायचा. कित्येक वर्षे त्यांनी हा ज्यूसबारचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा लहान भाऊ शुक्राचार्य वांजळे आता हा ज्यूसबार सांभाळतो. या व्यवसायातून मिळालेला पैसा वांजळे यांनी जमिनीत गुंतविला. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून त्यांनी संपत्ती मिळविली. मात्र, ही संपत्ती घरात न ठेवता त्यांनी गरीब, शेतकरी व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना काशीयात्रा घडविण्याची योजना सुरू केली. त्यांनी स्वखर्चाने हजारो नागरिकांना काशीयात्रा घडविली; तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन, तर मुस्लिम समाजाला अजमेरची यात्रा त्यांनी घडविली
.

 

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.